उपसंपादक – प्रशांत दाव्हाड
जव्हार – पावसाळा आला की गावात असलेली विहीर नादुरुस्त असल्याने गावातील ग्रामस्थानी अनेक समस्यांना सामोरे जावं लागत असे. पिण्यासाठी शुद्ध पाणी नसल्याने आजाराचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असे. गावातील ग्रामस्थाना पिण्यासाठी योग्य व शुद्ध पाणी मिळावं म्हणून सामाजिक कार्यकता कु. कमलेश पागी यांच्या पुढाकाराने गावातील युवकांना, महिलांना , लहान मुलांना एकत्र करून पिण्याचा पाण्याचा मार्ग कसा मोकळा होईल ग्रामस्थांना योग्य व शुद्ध कसे मिळेल हा विचार करून नागरिकांच्या सहकार्याने सहमतीने कोतीमाळ येथील पडित असलेली नादुरुस्त विहीर श्रमदानातून दुरुस्त करण्यात आली.
