मुख्य संपादक – दिनेश आंबेकर
उपसंपादक – प्रशांत दाव्हाड
पालघर-भारत आणि स्वीडन यांच्यातील द्विपक्षीय आर्थिक संबंध आणि नाविन्यपूर्ण भागीदारी मजबूत करण्याच्या उद्देशाने दोन्ही सरकारांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या विशेष बैठकीसाठी भारताचे वाणिज्य व उद्योगमंत्री मा. श्री. पीयूष गोयल यांच्या नेतृत्वाखाली एक भारतीय शिष्टमंडळ नुकतेच स्वीडन दौऱ्यावर गेले.या शिष्टमंडळात विक्रमगड येथील मूळ रहिवासी व सध्या मुंबईस्थित पोषण लाईफ सायन्सेस कंपनीच्या मुख्य प्रवर्तक सौ. सोनाली पाटील-माळी व त्यांच्या भावंड श्री. अक्षय पाटील यांचा सहभाग अत्यंत गौरवास्पद आहे. विक्रमगडसारख्या ग्रामीण भागातून आलेल्या एका तरुणीने मुंबईमध्ये स्वतःची कंपनी उभी करून जागतिक स्तरावर नावलौकिक मिळवणे हे संपूर्ण जिल्ह्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे. सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.या शिष्टमंडळात भारतातील नवोपक्रम, स्टार्टअप आणि उद्योजकतेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ६० स्टार्टअप्सचा समावेश होता. स्वीडन सरकार आणि भारत-युरोपमधील व्यापार वाढीसाठी विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. यावेळी मा. गोयल यांनी युरोपीय उद्योगपतींना भारतातील गुंतवणुकीच्या संधी, देशाच्या शाश्वत आणि प्रभावी विकासाचे मार्ग, तसेच झिरो डिफेक्ट-झिरो इफेक्ट या धोरणांची माहिती दिली.भारतातील कुशल व प्रतिभावान मनुष्यबळाच्या बळावर तंत्रज्ञान, नवकल्पना आणि संशोधनात झालेली प्रगती अधोरेखित करण्यात आली. स्वीडिश उद्योगांना भारतातील संधींचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. भारतीय शिष्टमंडळाने स्वीडनमधील विविध उद्योगांना भेटी देत त्यांच्या कार्यपद्धतीचा सखोल अभ्यास केला.या दौऱ्याचे यशस्वी आयोजन वाणिज्य मंत्रालय, भारत सरकार, भारतीय दूतावास – स्वीडन, तसेच यांच्या सहकार्याने करण्यात आले.
सौ. सोनाली पाटील-माळी
यांनी व्यवसायात घेतलेली ही भरारी आज पालघर जिल्ह्याच्या भूमीचा अभिमान वाढवणारी ठरत आहे.