*अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पालकमंत्र्यांनी केली पाहणी.*
उपसंपादक – प्रशांत दाव्हाड
*विक्रमगड* -विक्रमगड तालुक्यात टेटवाली या गावी अतिवृष्टीमुळे ज्या भागात नुकसान झाले आहे त्या भागाची नुकसानीची पाहणी पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेशजी नाईक यांनी केली.
यावेळी त्यांच्या समवेत पालघर जिल्ह्याचे खासदार डॉ.हेमंत सवरा , पालघर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी इंदूराणी जाखड तसेच पालघर जिल्ह्यातील सर्व अधिकारी, विक्रमगड तहसीलदार श्रीम. चारुशीला पवार,पालघर जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती संदिप पावडे, भाजपा विक्रमगड मंडळ अध्यक्ष रवींद्र भडांगे, भाजपाचे जिल्ह्याचे नेते मनोज भानुशाली व विक्रमगड तालुक्यातील नागरीक उपस्थित होते.
विक्रमगड तालुक्यातील टेटवाली गावासह नऊ गावांना चक्रीवादळाचा तडाखा बसून प्रचंड नुकसान झाले होते .अनेक घरावरील पत्रे उडून घराच्या भिंती कोसळल्या होत्या. दहा नागरिक जखमी झाले होते. वीज पडून शेतकऱ्याचा एक बैल मृत्यू झाला. झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याकरता पालकमंत्री विक्रमगड तालुक्यातील टेटवाली या गावी आले होते.
यावेळी पालकमंत्र्यांनी शासनाकडून सर्वतोपरी मदत दिली जाईल .पण तत्पूर्वी नुकसानग्रस्त कुटुंबांना तातडीने अन्नधान्य व सीएसआर फंडातून शक्यती मदत लवकरात लवकर देण्याचे आश्वासन दिले.